काही दिवसांपूर्वी वर्तमानपत्रामध्ये बातमी होती. 'एस. टी. आपला चेहरा बदलणार.'
अश्या बातम्या या आधी बऱ्याचदा वाचण्यात आल्या. पण एस. टी. काही सुधारत नाही.
अश्या बातम्या या आधी बऱ्याचदा वाचण्यात आल्या. पण एस. टी. काही सुधारत नाही.
अजूनही बऱ्याच गावातील बस थांबे तितके चांगले नाहीत. तिथे गाड्या थांबत नाही. सगळ्यात महत्वाचं, अजूनही वाहक नीट वागत नाहीत. काही चालक गाड्या रेस कार असल्यासारखे चालवतात. काही गाड्या चांगल्या अवस्थेत नाहीत.
लोकांना सगळ्यात जास्त राग असेल तो एस. टी. वाहकाचा.
"तिकडे जागा आहे. तिकडे जाऊन बसा." जर तुम्ही वाहकाच्या बाजूला जाऊन बसलात तर हे वाक्य कायम ऐकायला मिळतं.
"गाडी तिथे थांबत नाही." अस उर्मट उत्तर पण ऐकायला मिळत.
"समोर पाटीलावली आहे, ती वाचा की जरा जाऊन. दिसत नाही का? कशासाठी लावली आहे?" असा अपमानकारक उत्तर पण बऱ्याचदा ऐकायला मिळतं.
जी अवस्था एस. टी. ची तीच रेल्वे ची. गाड्या कायम उशिराने चालणे, आरक्षणासाठी मोठी रांग असणे, खिडकीतल्या माणसाने नीट न बोलणे, गाड्यांचे अपघात होणे, डब्यात स्वच्छता नसणे आणि अजून बरच काही.
अशीच यादी करत गेलो तर ब्लॉग असाच भरून जाईल.
अशीच यादी करत गेलो तर ब्लॉग असाच भरून जाईल.
आणि याची अजून माहिती सांगणारे बरेच लेख, ब्लॉग वाचायला मिळतील. कोणत्याही माणसाला विचारलं तर यात असणारे सगळे त्रास ऐकायला मिळतील.
आणि हे सगळं खरंपण आहे. पण यापेक्षा महत्वाची गोष्ट आहे की, अस आता कितीवेळा होत?
बऱ्याचदा होतं. पण आता या दोन्ही मंडळांचा व्याप लक्षात घेतला तर १०० पैकी किती वेळा असा अनुभव येतो? कदाचित १० वेळा, १५ वेळा. आणि हीच गोष्ट आपण बघत नाही.
मागे झालेल्या ज्ञानेश्वरी इक्सप्रेस च्या अपघातानंतर एक ब्लॉग वाचला. त्यात रेल्वेच्या नावाने भरपूर लोकांनी बोटे मोडली. आरक्षण दलाल कडून घेतल्याने अपघात झालेल्यांची नावे कळत नाही. त्यांच्या नातेवाईकांना मदत मिळत नाही. रेल्वे ने आरक्षण पद्धतीत सुधारणा करायला हवी. आणि बरेच काही. पण एकंदरी सगळा दोष रेल्वे ला देण्यात आला होता.
अपघात रेल्वेच्या चुकीमुळे झाला हे मान्य, पण रेल्वेच तिकीट योग्य माणसाकडून न घेण यात चूक कोणाची? केवळ काही पैसे वाचतात किंवा त्रास वाचतो म्हणून दुसऱ्याकडून तिकीट घेणं ही चूक कोणाची?
मी लहान असताना रेल्वेचं तिकीट फक्त तिकीट खिडकीतच मिळत असे. आणि त्या वेळेस तर दलाल फारच जास्त होते. कारण आधीच भरपूर तिकीट काढणं शक्य होत.
पण आता पद्धत बरीच बदलली आहे. तुम्ही तिकीट घरी बसून इंटरनेट वापरून काढू शकता. रेल्वे अधिकृत एजंट नेमून दिले आहेत त्यांच्याकडून तिकीट काढू शकता. आणि तेही नाही जमलं तर तिकीट खिडकी कायम चालू असते.
आज ९०% गाड्या वेळेवर धावतात. जरी धावणारा गाड्यांची संख्या वाढली असली तरी अपघातांचा प्रमाण कमी झालं आहे. पूर्वी प्रत्येक महिन्यात अपघाताची बातमी असायची. पण आता ते कमी झालं आहे. कोणत्याही गाडीच वेळापत्रक तुम्ही घर बसल्या पाहू शकता. कोणत्याही गाडीतल्या आरक्षणाची स्थिती लगेच कळते. त्याहीपेक्षा कोणत्याही धावणाऱ्या गाडीची त्या क्षणाची स्थिती सुद्धा कळते. गाडी वेळेवर आहे की उशिरा आहे. उशिरा असेल तर किती उशिरा आहे. सध्या कोणत्या स्थानकाच्या पुढे गेली आहे. आणि अजून काही.
आज ९०% गाड्या वेळेवर धावतात. जरी धावणारा गाड्यांची संख्या वाढली असली तरी अपघातांचा प्रमाण कमी झालं आहे. पूर्वी प्रत्येक महिन्यात अपघाताची बातमी असायची. पण आता ते कमी झालं आहे. कोणत्याही गाडीच वेळापत्रक तुम्ही घर बसल्या पाहू शकता. कोणत्याही गाडीतल्या आरक्षणाची स्थिती लगेच कळते. त्याहीपेक्षा कोणत्याही धावणाऱ्या गाडीची त्या क्षणाची स्थिती सुद्धा कळते. गाडी वेळेवर आहे की उशिरा आहे. उशिरा असेल तर किती उशिरा आहे. सध्या कोणत्या स्थानकाच्या पुढे गेली आहे. आणि अजून काही.
रेल्वे आशिया खंडातील सगळ्यात मोठी संस्था आहे. सगळ्यात जास्त नोकऱ्या रेल्वे ने उपलब्ध करून दिल्या आहेत. लोकांना आराम मिळावा म्हणून गाड्यांमध्ये बऱ्याच सुधारणा करण्यात आल्या आहे. 'राजधानी', 'शताब्दी' सारख्या सुपर फास्ट आणि आरामदायक गाड्यांसोबत 'गरीब रथ' सारख्या सामान्यांना परवडणाऱ्या गाड्याही आहेत. निसर्गाचा अविस्मरणीय अनुभव देणारी 'कोकण रेल्वे' आहे. राजस्थान फिरवून आणणारी 'Palace on wheels' आहे.
मुंबई, भारताची आर्थिक राजधानी असलेल शहर तर 'लोकल' च्या जोरावर धावत आहे. मुंबई चा जणू कणाच तो.
पूर्वी अपघातानंतर २-३ दिवस बंद असलेले मार्ग आता काही तासात मोकळे केले जातात. मुंबईतील बॉम्ब स्फोटानंतर संध्याकाळी ७ वाजता बंद झालेली लोकल दुसऱ्या दिवशी सकाळी ४ वाजता नव्या दमाने लोकांच्या सेवेसाठी हजर होती. दिवसभरात दर १० मिनिटात एक लोकल सुटत असली तरी गाड्या केवळ काही मिनिटाच्याच उशिराने चालतात.
अशीच प्रगती एस. टी. ने पण केली आहे. आज एस. टी. च्या २१००० हून अधिक गाड्या आहेत. गाड्या फलाटावर लावण्या आधी आतून व बाहेरून स्वच्छ केल्या जातात. खराब गाड्यांची ताबडतोप दुरुस्ती केली जाते, किंवा बदलल्या जातात. अपघात लक्षणीय प्रमाणात कमी झाले आहेत. १० पैकी ९ वाहक आता चांगले वागतात. चालक पण खेडेगाव असेल तरी गाडी थांबवतात.
'लाल डब्बा'म्हणून कायम हिणवल्या जाणाऱ्या एस. टी. ने 'शिवनेरी' सारख्या गाड्याही सुरु केल्या आहेत. प्रत्येक स्थानकावर तक्रार पुस्तक असते. आणि त्यात लिहिलेल्या प्रत्येक तक्रारीची दखल घेतली जाते. (याचा अनुभव घेऊनच हे लिहितो आहे)
मी एकदा कल्याण हून नगरला येत होतो. रात्रीची वेळ होती. त्या रस्त्यावर लहान गावे बरीच आहेत. बऱ्याच छोट्या वस्त्याही आहेत. त्यामुळे तिथे उतरणारे पण होते. पण चालक आणि वाहकाने कोणताही आढा-वेढा न घेता प्रत्येक वस्तीवर गाडी थांबवली. एक काका तर बस फाट्यावर थांबत नाही म्हणून थोडा अलीकडेच उतरत होते. तर वाहकानेच त्यांना बसून राहायला सांगितला आणि त्यांच्या वस्तीच्या फाट्यावर सोडलं.
असे अनुभव बरेच आहेत. आणि आपल्यापैकी बऱ्याच जणांना आले असतील. पण ते सगळे फक्त त्या प्रवासापुरातेच असतात. बाहेर आल की परत फक्त चूकच दिसतात.
आपल्या मित्राच्या बऱ्याच चुका आपण त्याच्या एका चांगल्या कामासाठी सोडून देतो. पण इकडे परिस्थिती उलटी आहे. या दोन्ही मंडळांच्या एका चुकीसाठी आपण त्यांच्या बऱ्याच चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो.
ही मंडळे परिपूर्ण नाहीत. उणीवा आहेत. पण त्या दूर करण्याचा प्रयत्नही केला जातोय हे नाकारता येणार नाही.
"प्रवाश्यांच्या सेवेसाठी" हे एकेकाळी नुसताच लिहायला म्हणून असलेल वाक्य खरा करण्याच प्रयत्न एस. टी. करतेय हे मान्य करायलाच हव.प्रत्येक सुधारणा होण्यासाठी वेळ लागतो आणि तो वेळ आपण यांना दिलाच पाहिजे असा मला वाटत.
उन्हाळ्याच्या सुट्टी मामाच्या गावाला जायचं असो किंवा दिवाळीत आजोबांकडे जायचं असो;
राखी बांधायला बहिणीकडे जायचं असो किंवा नाताळच्या सुट्टीत फिरायला जायचं असो..
या संस्था कारण न देता आपल्या सेवेसाठी हजर असतात. नुसत्याच हजर नसतात तर या काळात जादा गाड्या असतात. "हॉलिडे स्पेशल ट्रेन" असतात.
स्वतः आपल्या घरापासून दूर राहून हे कर्मचारी आपल्याला आपल्या नातेवाईकांकडे पोहोचवण्यास तयार असतात. स्वतः बसच्या बाकड्यावर झोपून, आपल्या मुलांना आजीच्या कुशीत गोष्ट ऐकत झोपण्यासाठी. स्वतः कॅन्टीन चा जेवण जेऊन घराबाहेर राहणाऱ्या मुलांना घरी नेतात आईच्या हातच जेवण्यासाठी, आपल्या घरापासून दूर राहतात प्रेयकर - प्रेयसीची भेट घालून देण्यासाठी..
कदाचित म्हणूनच या संस्था कित्येक दशके फक्त म्हणतात, "प्रवाश्यांच्या सेवेसाठी"
...आयुष्य खूप सुंदर आहे, ते अजून सुंदर बनवणार...