Monday, May 31, 2010

आता तुम्हाला कसा वाटतंय?

कोणत्याही न्यूज channel वर कायम विचारला जाणारा प्रश्न.

"दहशतवाद्यांच्या हल्ल्यात तुमचा मुलगा मारला गेला, आपल्याला कस वाटतंय?"

असा काही प्रश्न आला कि मला त्या रिपोर्टर ला फार फार मारावस वाटत. आणि मग आपण त्याला विचारायचं "आता तुम्हाला कस वाटतंय?". हे विचारायची गोष्ट नाहीये. आणि ज्या व्यक्तीने आपला कोणीतरी जवळचा माणूस गमावलाय त्याला तर नाहीच नाही. हे कोणत्याही साधारण बुद्धी असलेल्या माणसाला कळत.
आणि रिपोर्टर म्हणजे सामान्य पेक्षा जास्त बुद्धिमत्ता असलेली व्यक्ती असते. मग हे त्यांना कस नाही कळत?

त्यांना स्वतःला असा प्रश्न कधी पडला नसेल कि अश्या प्रसंगी आपल्याला कस वाटतंय? तरी पण का विचातात ते असले फालतू प्रश्न? उत्तर माझ्याकडे नव्हत. आणि माझा कोणी मित्र या क्षेत्रातला नाहीये त्यामुळे त्यांनाच विचारण हि जमल नाही.
सध्यातरी अस काही झाल कि रिपोर्टर च्या नावान ४ अपशब्द बोलायचे आणि channel बदलायचं हेच शक्य होत.

परवा पण तेच करत होतो. सोबत मित्र होता, त्याला हसू आलं??
"का हसलास?", मी.
"उगाच रे. काही नाही. तू रागावशील."
अस म्हटल्यावर कोण शांत बसणार? "आता सांगच."
"मग अश्या परिस्थितीत तो दुसर काय  बोलू शकतो?"
"काहीपण वेगळ विचारावं. पण हा काय प्रश्न आहे, तुम्हाला कस वाटतंय?"
"काहीपण म्हणजे काय? एखादा तरी दुसरा प्रश्न सांग."
"मला नाही सुचत अश्या वेळी काय बोलायचं ते."

"मग त्याच्याकडून ती अपेक्षा का? तो तर तुझ्यापेक्षा वाईट  परिस्थितीत असतो. तो तिथे सगळ्यांच्या समोर असतो. रडणारे, आक्रोश करणारे लोक तिथे असतात. तिथे तो दुसर काय बोलणार? काय आणि कस झाल हे सगळ आधीच सांगून झालेलं असत. यापेक्षा दुसरा असा कोणता प्रश्न आहे? या प्रश्नामुळे तिथल दुःख  कमी होत नाही, पण किमान वाढत तर नाही..."

"तू त्या रिपोर्टर ची बाजू घेतोयेस?", मी रागातच बोललो.
"तसं नाही, पण फक्त त्याचीच चूक आहे हे मला मान्य नाही. त्याला तसं बोलायला भाग पाडलं जात."
"कोण करेल असं?"
"आपण सगळे."
"काहीतरीच बोलू नकोस."
आणि तो एकदम फॉर्म मध्ये आला. "मग १ तास झाला उगाच channel का बदालतोयेस? काय शोधातोयेस TV वर?"
"काहीतरी चांगल, इंटरेस्टिंग."
"there you go. काहीतरी इंटरेस्टिंग असल्याशिवाय आपण channel बघतच नाही ना. काहीतरी मसाला हवा असतो. twist हवा असतो."
"अरे पण असला मसाला कोणाला हवाय?"
"नाही हवाय? मग का अजूनपर्यंत News TV का चालू आहे? त्यानी त्याच दुकान का बंद नाही केल अजून?"
"कारण काही वेडे लोक बघतात ते channel अजून."
"काही नाही, फार जास्त वेडे लोक बघतात. कारण आपल्याकडे अश्या वेड्या लोकांची कमी नाहीये." आता तर तो पण जोश मध्ये आला होता.

"अरे पण काही लोक ते time pass म्हणून बघतात." मी जरा defence मध्ये बोललो.
"अरे पण बघतातच ना. channel ला TRP मिळतोच ना. जाहिरात मिळवायला तेच लागत. आणि तोच तर मुख्य धंदा आहे. इथे बातम्या देऊन तुमच ज्ञान वाढवायला कोण समाज सेवक बसलेत काय? इथे प्रत्येकजण business करायला बसलाय. सध्या बातम्या बघायला कोणाला वेळ आहे. लोकांना कामातून वेळ मिळाला कि entertainment हवी असते. त्या बोर बातम्या ऐकून अजून डोक कोण खराब करेल?
तू कंपनी चा मार्केटिंग manager आहेस. client ला मस्का लावून, थोडा फार का ना होईना जास्तीच बोलून डील पक्की करतोसच ना?"
"अरे पण ते माझं काम आहे?"
"मग न्यूज तयार करून ती लोकांच्या गळी उतरवण हे त्याच काम आहे. त्याच त्याची चूक ती काय? त्याने ते नाही केल तर उद्या chennel त्याला लाथ मारून हाकलून देईल. मग त्याच्या पोटा-पाण्याचा काय?
आणि जर लोक नाहीच बघत अश्या बातम्या, तर सगळेच channel असली भंकसगिरी करतायेत. त्यांचा TRP का कमी नाही होत मग?"
यावर माझ्याकडे उत्तर नव्हत. आणि तो म्हणत होत ते खरपण होत.

"मला एक सांग, तू तुझ्या client ला काय देतोस?"
"जो ते मागेल तो.", मी पुढच्या वाराचा अंदाज घेऊन बोललो.
"मग channel वाला तेच करतोय तर तुम्हाला राग का येतो? तुम्ही त्याच channel बघता म्हणून तुम्ही त्याचे client झाला. बरोबर कि नाही?"
मी फक्त होकारार्थी मान डोलावली.
"मग तूच आत्ता म्हणालास ना काहीतरी इंटरेस्टिंग पाहिजे. ते त्यांनी दिल तर तू त्याला शिव्या देतोस. आपल्याकडचे बहुतांशी लोक ह्या सगळ्या बातम्या मनोरंजन म्हणून बघतात. ४ शिव्या देऊन कुठलातरी राग यांच्यावर काढतात. आणि परत तेच channel बघतात. तुम्हाला इतकाच राग येतो तर बघूच नका ना ते chennel . TRP कमी झाला कि तो आपोआप सरळ बोलेल. त्यांनी कुठे जबरदस्ती केलीये कि तुम्ही आमचा channel नाही बघितला तर तुम्हाला दंड करू म्हणून."

"मग TV वर बघायचं तरी काय?", काहीतरी बोलून विषय बदलायचा तर भलताच काहीतरी बोललो...

तो बोलला ते सगळ पटल. म्हणून TV बंद करून टाकला.

आणि मग त्यानी हळूच विचारलं, "तुम्ही तोंडावर आपटलात, आता तुम्हाला कसा वाटतंय?"
--------------------------------------------------------------------------------------------------------

वरील लेखात कोणालाही दुखावण्याचा किंवा कोणावरही कोणत्याही प्रकारचा आरोप करण्याचा हेतू नाही. कोणाला तसे काही वाटल्यास क्षमस्व. पण यातील जे चांगल वाटेल ते घ्याव आणि बाकी सोडून द्याव हि विनंती.

...आयुष्य खूप सुंदर आहे, ते अजून सुंदर बनवणार...