Thursday, June 23, 2011

(अ)नियम

"FIrst Break All The Rules"
(कोणी लिहिलंय ते माहित नाही, पण मस्त लिहिलंय)
जगभरात थोरामोठ्यांनी अनेक संदेश दिले आहेत. त्यात सगळ्यात जास्त पाळला जाणारा संदेश हाच असावा.

मेंदूला चालना मिळून आपण काहीतरी नवीन शोधाव म्हणून सांगितलेली शिकवण. काय असेल ते असो पण सगळेच जण मनापासून प्रामाणिकपणे पाळतात ही शिकवण.

दिसला नियम की तोड!!!

परीक्षेत पास झाल्यावर जसा आनंद होतो, तसा काहीस फिलिंग येत नियम तोडल्यावर.

याच सगळ्यात मस्त उदाहरण बघायचं असेल तर कोणत्याही इमारतीच्या जिन्यात जाव. बाकी संपूर्ण इमारतीचा रंग काहीही असो, पण जिन्याच्या कोपर्याचा रंग कायम लालच असतो.
"कृपया थुंकू नये" हे शब्द बिचारे कोपर्यात कुठेतरी अंग चोरून उभे असतात.

"चालत्या बस मध्ये चढू अगर उतरू नये." हा नियम लोक जीवाच्या भीतीने पाळतात पण मग त्यात मजा काय ना? म्हणूनच बसचालक बस नेहमी थांब्याच्या थोड्या पुढे किंवा कधी थोड्या मागेच उभी करतात. (कधी कधी तर हे थोडा अंतर वाढत वाढत बस डायरेक्ट पुढच्याच थांब्यावर.) अश्या वेळेस चालत्या सोडा धावत्या बसमध्ये चढाव लागत. :D

"नो पार्किंग" ही संकल्पना तर गम्मतच आहे. ही पाटी कायम गर्दीत वाट हरवल्यासारखी उभी असते. मग पाटीला वाईट वाटू नये म्हणून मग त्यातला 'नो' खोडून टाकायचा.

डाव्याबाजुने ओव्हरटेक करू नये; हा नियम तर बादच करायला हवा.
त्याऐवजी नवा नियम तयार करायचा, "कृपया जागा मिळाली तरच ओव्हरटेक करा, उगाच मध्ये मध्ये वाहन आणू नका"
(कारण आजकाल बाजू बघायला रस्त्यावर जागा आणि लोकांकडे वेळच नाहीये)

असो अशी यादी करत गेलो तर कदाचित भारताचं नाव (अ)संविधान तयार होईल.

सरळ सांगून कोणी ऐकत नाही, म्हणून नियम केले. तर नियम तोडण्यात सगळे पुढे. म्हणूनच कदाचित पुणेरी लोकांनी नवी शक्कल लढवली. "नो पार्किंग" च्या ऐवजी "इथे गाडी लावणारा मी गाढव आहे" असं लिहायला सुरुवात केली. (हेतू नक्कीच साध्य होत असावा. :D)

नियम आला की लगेच त्याच्या पळवाटा शोधायला सुरुवात होते. पण हे सगळ्यांना ज्याच्या त्याच्या सोयीने करायचं असत.

याच सगळ्यात सार्थ उदाहरण म्हणजे भ्रष्टाचार.
माझा एक मित्र एकदा सांगत होता, "भ्रष्टाचार करू नये. आपणच पुढाकार घेतला नाही तर हे कस बदलणार?" आणि असं बरंच काहीतरी तत्वज्ञान देत होता.
दुसर्या दिवशी त्याच्या पासपोर्ट साठी त्याला पोलीस व्हेरिफिकेशन साठी जायचं होतं. आदल्या दिवशीच मला तत्वज्ञान दिल्याने त्याने पैसे दिले नाही. मग काय हवालदार काकांनी पण कारणं द्यायला सुरुवात केली. आणि मग जास्त त्रास नको म्हणून त्याने गपचूप २०० रुपये दिले आणि काम पूर्ण करून घेतलं.

मी: का रे आता कुठ गेल तुझ तत्वज्ञान?
मित्र: अरे आत्ता जरा अर्जंट मध्ये पास्स्पोर्त हवा आहे. जायचं आहे पुढच्या महिन्यात बाहेर. पुढच्या वेळेस बघ पैसे ना देता काम करून घेईल.

प्रत्येकच थोड्याफार फरकाने असाच असत. स्वतः नियम तोडताना 'इमर्जन्सी आहे रे' आणि इतरांनी केला तर 'यामुळेच भारत पुढे जात नाही.'

मुळात नियम करावेच का लागतात?
"साक्षर लोकांना सुशिक्षित कारण हीच या देशाची खरी गरज आहे" (कायद्याच बोला चित्रपटातील वाक्य)
चांगल कसं वागायचं हे सगळ्यांनाच काळात. मग नियम का लागतात? कारण प्रत्येकजण परिस्थिती आपल्या सोयीने बघतो.

नो पार्किंग चा नो खोडण्यात मेहनत घेण्यापेक्षा गाडी योग्य जागेत लावण्याची मेहनत घ्यावी.
"पण मग त्याने का नाही गाडी जागेवर लावली? आधी त्याला सांगा." ही मानसिकता कायम आड येते.

ही विचारसरणी जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत सगळे नियम व्यर्थ. आणि बदलल्यानंतर कदाचित नियमांची गरजच उरणार नाही...

Tuesday, June 7, 2011

परीक्षा

ऑफिस मध्ये अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा चालू होती.सगळी तयारी झालीये पण काहीतरी एक राहिलंय असे काहीसे चेहऱ्यावरील भाव. किंचित टेन्शन.
त्यात मी कडक आवाजात सूचना देऊन वातावरण अजून थोडसं गंभीर केल.

Start म्हटल्याबरोबर सगळेजण पेपर सोडवण्यात दंग. त्यांना बघून मला माझे कॉलेजमधले दिवस आठवले. पूर्ण semester अभ्यास केलेला नसायचा. आणि मग परीक्षा आली की सॉलिड वाट लागायची.
त्या एका वर्गात कितीतरी भाव एकत्र आलेले असतात.
ज्याला सगळ्या प्रश्नांची उत्तरे येत असतात तो तर राजधानी एक्सप्रेस प्रमाणे सुटलेला असतो. ज्याला काही  येत नसत तो आपला पासेंजर प्रमाणे सगळी कडे थांबत थांबत उत्तर मिळवण्याचा प्रयत्न करत असतो.
कोणी नख खातात, कोणी डोक खाजवतात, कोणी सारखे घड्याळाकडे बघत असतात तर कोणी पेपर सेट करणार्याला नाव ठेवत बोट मोडत असतात.
कोणाची पेपरवर  गणित मांडलेली असतात तर कोणाची हवेतच आकडेमोड चालू असते.
सगळी उत्तर येणाऱ्याची चिंता वेगळीच असते. "साला सगळी उत्तर इतकी सहज येतायेत, काही चुकत तर नाहीये ना??" (मला असं बऱ्याचदा होतं. :D)

आपल्याला उत्तर येत नसल की आपण मग आपल्यासारखा अजून कोण आहे का ते शोधत असतो. कोणी तरी सापडतच. मग जरा समाधान मिळत. तितक्यात आवाज येतो,
"सर, सप्लीमेंट."
झाल. आपल उरल सुरलं अवसान पण गळून पडत. मग सगळी हुशार मुल सप्लीमेंट मागायला सुरुवात करतात. (कधी कधी मोकळीच. उगाच भाव खाऊन जायचं म्हणून.)

परीक्षेत आपल्याला मागच्या महिनाभरात घोकालेल सगळच उतरवायचं असत. पेपर च्या अर्धा तास आधी वाचलेलं सगळ्यात आधी बाहेर काढव लागत. कारण ते पुसलं जाण्याची शक्यात फार जास्त. पेपर च्या आधी, "अरे काय टेन्शन घेतो यार? सोप्पा विषय आहे हा एकदम"  म्हणणारे पण घाम पुसताना दिसतात.

जुन्या काळी परीक्षा म्हटली की पाठीत गोळे यायचे. कारण जर मार्क कमी पडले तर शाळेत गुरुजी मारणार आणि घरी आल्यावर गुरुजींनी तुला टोले दिले म्हणजे तुझच चुकल असणार असं म्हणून वडील फैलावर घेणार.

पण आता परीक्षा म्हटली की पोटात गोळे येतात. (मुलांच्या नाही, त्यांच्या पालकांच्या. मुलांचा अभ्यास घ्यायचा असतो ना)
युद्धावर निघालेल्या राजासारखी पालकांची तयारी चालू असते मुलांच्या परीक्षेसाठी.

बर परीक्षा झाली की आराम नाही. कारण लगेचच निकाल  लागणार असतो. आणि त्यावरच रोजच्या खेळण्याचा वेळ अवलंबून असतो. (inverse proportion मध्ये)

"सर, टेस्ट चा रिझल्ट कधी येणार?" "इन्टरव्हीव्यू लगेच होणार का?" असे एकामागून एक प्रश्न मुलांनी मला विचारायला सुरुवात केली. सगळ्यांना जेवून यायला सांगून मी पेपर चेक केले. आणि इन्टरव्हीव्यू चा शेड्युल तयार केल.
रिझल्ट ची घाई करणारे हेच मुलं इन्टरव्हीव्यू शेड्युल बघून एकदम फुस्स झाले. "सर, मला पहिले नाही जायचं. दुसर कोणीच नाही का? त्याला पाठवा, तो हुशार आहे."
"सर किती जण असतात इन्टरव्हीव्यू घ्यायला? कसे प्रश्न विचारतात?"
मला वाटायला लागल जसा काय माझाच इन्टरव्हीव्यू चालू होता.

तिकडे रूम मध्ये इन्टरव्हीव्यू सुरु, आणि बाहेर सगळ्यांच्या फेऱ्या सुरु. भयंकर बेचैनी. आणि घड्याळाचा काटा एकदा २० मिनिटांच्या वर गेला की सगळ्यांचे चेहरे हवा गेलेल्या चेंडूसारखे होतात.
सिंहाच्या गुहेतून मुलगा बाहेर आला की लगेच सगळे त्याच्यावर परत तुटून पडतात. "काय विचारलं? प्रोजेक्ट चा काय सांगितलं? अवघड प्रश्न विचारतात का?"
इन्टरव्हीव्यू चांगला गेलेला मुलगा एकदम वाघ मारून आल्यासारखा असतो नाहीतर वाघ मागे लागलेल्या शिकाऱ्यासारखे भाव दिसतात.

सगळ झाल की मग पुन्हा, "सर फायनल रिझल्ट कधी?"

परीक्षेच्या आधी आणि रिझल्ट च्या आधी नक्कीच देवाचा inbox कायम फुल राहत असणार. कोणाला रिझल्ट चांगला हवा असतो तर कोणाला तो पुढे ढकलला जावा असं वाटत असत.

शेवटी मुलं ती मुलच, परीक्षा त्या परीक्षाच, इन्टरव्हीव्यू ते इन्टरव्हीव्यूच राहणार. या सगळ्यांचा स्वरूप कायम बदलत राहणार. पण एक नक्की पोटात होणारी गडबड कायम तशीच राहणार. :)

...आयुष्य खूप सुंदर आहे, ते अजून सुंदर बनवणार...