Tuesday, January 31, 2012

"मंगल परिणय"



"लग्न" प्रत्येकाच्या आयुष्यातील सगळ्यात महत्वाच्या गोष्टींपैकी एक.
batchlor 's लाईफ मधून एका दिवसात responsible लाईफ मध्ये परिवर्तन.

मुलगा (२५) आणि मुलगी (२२) ची झाली की सगळीकडे स्थळ बघायला सुरुवात.

कसरत इथूनच सुरु होते. कितीतरी गोष्टी बघितल्या जाता.
मुलगी शिकलेली पाहिजे (बाबा), घर सांभाळणारी पाहिजे (आई), नोकरी करणारी हवी (ताई), घरात राहणारी हवी, मोठ्यांना सांभाळणारी हवी (आजी-आजोबा)
आणि अशी बरीच यादी असते. घरातल्या ईतर लोकांची पण एक अशीच यादी तयार असते.
स्वयंपाक येणारी हवी, आम्हाला मान देणारी हवी (चुलत बहिणी), सुंदर मुलगी बघा हा भावोजी (वाहिनी) आणि असं अजून बरंच काही.

मुलगा बघताना parameter बदलतात.
मुलगा शिकलेला पाहिजे, चांगली नोकरी हवी, (व्यवसाय असेल तर मुलगा वेटिंग लिस्ट वर.) शक्यतो भाऊ बहिण नसावे (म्हणजे भविष्यात होऊ शकणारे तंटे टळतात) मुलगा शहरात राहणारा आणि आई वादिन गावाकडे असतील तर उत्तमच.(सासू सासऱ्यांचा त्रास कमी) आणि अजून बरंच काही.

या सगळ्या गोंधळात मुला मुलीला कसं सोबती हवा हेच राहून जात. आजकालच्या बदलेल्या स्थितीत मुला मुलीला बोलण्यासाठी भेटण्यासाठी वेळ दिला जातो. त्यामुळे बऱ्याच गोष्टी त्यांच्या हिशोबाने ते बघतात.
जे प्रेम विवाह करतात तिथे बाकीच्यांना कल्टी मिळते. मुलगा मुलगी फक्त महत्वाचे. पण या फायद्यासाठी त्यांना भरपूर संघर्ष पण करावा लागतो.

काही दिवसांपूर्वी आमच्या ऑफिस मध्ये एक सेशन झालं. नुकताच लग्न झालेले, ज्यांची process चालूल आहे अश्यांसाठी.
त्यात विचारलं आपण लग्न का करतो? वेगवेगळी कारण बाहेर आली:
१. प्रेमासाठी
२. सोबतीसाठी
३. समाज म्हणतो म्हणून
४. आई वडील म्हणतात म्हणून
५. responsible व्यक्ती स्टेटस मिळावा म्हणून.
६. करायचं म्हणून करायचं.

प्रत्येकाची कारण वेगळी असतात. तसेच प्रत्येकाची आपला सोबती कसा असावा याच्या संकल्पना ही वेगळ्या असतात.
सुंदर असावी, स्वयंपाक येत असावा, नोकरी करणारी असावी, सगळ्या गोष्टी एन्जोय करणारी असावी.
किंवा handsome असावा, चांगला पगार असावा, माझ्यासोबत shopping करायला यायला तयार असावा, ईत्यादी.

या सगळ्यात एक गोष्ट सगळ्यात महत्वाची असते, ती म्हणजे आपला सोबती समजूतदार असावा. एखाद्या गोष्टीत समजूतदार पण ना दाखवल्यास छोटीशी गोष्टही कुठल्या कुठे जाते.

घटस्फोट, लग्नानंतर घडू शकणारी सगळ्यात वाईट गोष्ट. निम्म्याहून जास्त लग्न समजूतदार पणा नसल्याने मोडतात.
समजदार नाही म्हणजे व्यक्ती वेडी आहे असं नाही. आयुष्यात कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्याव हे कळाल नाही की झालं.

ऑफिस सेशन मध्ये एक केस सांगितली.
एका मुलीला दम्याचा त्रास होता. पण बाकी सगळ्या गोष्टी फार चांगल्या होत्या म्हणून मुलगा तयार होता लग्नाला.
पण लग्नानंतर एकाच महिन्यात भांडण सुरु झालं. दम्यामुळे तिला आजूबाजूला कोणी स्केंत किंवा देओ मारलेला चालत नसे. आणि त्याला ही गोष्ट पटत नव्हती. त्याला वेगवेगळे देओ वापरायचा छंद होता.

अश्या वेळेस प्राधान्य कोणाला द्यायचं?
दमा, आपला सोबती, की आपला छंद?

सगळ्यांनाच आपला सोबती राजकुमार किंवा राजकुमारी असावी असं वाटत. या जगात कोणीच परिपूर्ण नाही. त्यामुळे राजकुमार मिळण पण शक्य नाही.
आणि एखादी राजकुमारी मिळालीच तर आपण स्वतः राजकुमार आहोत का हे पण बघायला हव.

तडजोड कुठे ना कुठे तरी करावीच लागणार. मग ती करून संसार हसत खेळत ठेवायचा की आपल्या जोडीदाराकडून शक्य नसलेल्या अपेक्षा करून त्रागा..
पाण्याने अर्ध्या भरलेल्या पेल्यासारख आहे. जे बघू तेच दिसेल.

नजर आपलीच, विचार आपलाच, समजूतदारपणा आपलाच आणि पर्यायाने सुखी संसारही आपलाच.

(ता. क.: माझही लवकरच लग्न होणार आहे त्यामुळे सुचलेला हा विषय आणि ठरवलेल्या काही गोष्टी. :D परीक्षा लवकरच आहे. :D) 

...आयुष्य खूप सुंदर आहे, ते अजून सुंदर बनवणार...

Friday, January 20, 2012

देवाचं ऑफिस



आपल्याकडे ऑफिस मध्ये प्रत्येक गोष्ट कागदावर लिखित स्वरूपात हवी असते. कारण उद्या कोणी काही चौकशी काढली, कोणी काही चूक केली तर लगेच आपण कागदोपत्री दाखले देऊन आपल्या डोक्यावरून दोष झटकून मोकळे. 

आणि अश्याच गरजेच्या वेळी जर तो कागदच गहाळ झाला तर??
आपलं नशीब तर असं असत, की कामं नसेपर्यंत आपण सगळ सांभाळून ठेवतो. आणि ज्या दिवशी आपण कागद / मेल फेकून देतो नेमकी दुसर्या दिवशीच त्याची गरज पडते.
आकाश पातळ एक करून आपण ते शोधायच्या मागे. आणि इतक करूनही नाही सापडला कागद की मग देवाचा धावा..

देवाची सगळी कामं जशी परफेक्ट असतात तशी आपली का होत नाहीत?

गेली कित्येक वर्षे देव संपूर्ण ब्रम्हांड अगदी व्यवस्थितपणे चालवतोय. एकही चूक नाही.
देवाचं एक बर आहे, सगळ ब्रम्हांड त्याचंच. कोणाला उत्तर द्यायचं नाही, कोणाच ऐकून घ्यायचं नाही.

पण देवाला कोणाला उत्तर द्यायचं असेल तर? त्यालाही कोणीतरी वरून order देत असेल तर? त्यालाही वर्षाअखेरीस balance sheet मध्ये नफा दाखवावा लागत असेल तर?

सगळ्या देवांचे सदा हसमुख भाव एकदम बदलतील.

देव त्याच्या क्युबिकल मध्ये. (अर्थात क्युबिकल पण मोठं असणार म्हणा) समोर भला मोठं १००" स्क्रीन. त्यावर १५००-१६०० application एकत्र चालू. आणि देव कोणत्यातरी  फाईल  मध्ये डेटा अपडेट करतोय.
पूर्ण जगातले इतके लोक, प्रत्येकाचा पाप पुण्याचा प्रत्येक मिनिटाचा हिशोब. सगळा डेटा नुसता बघूनच चक्कर यायची.
मग इतक्या मोठ्या गबाळात कुठेतरी गडबड ती व्हायचीच. एखाद वेळेस कॉम्पुटर hang होणार. मग त्याचा खाली काय असार होणार?

या सगळ्यात एखाद्या फाईल मधला डेटा चुकून डिलीट झाला की खाली त्या व्यक्तीची लगेच "याददाश्त गायब"
"मै कहा हु? मै कौन हु?" मोड मध्ये जाणार.
एखाद्या फाईल च्या प्रोग्राम मध्ये शेवटी end कमांड लिहिली आणि फाईल बंद करायची राहिली की खाली माणूस कोमा मध्ये.
वरती area manager ची टारगेट ची मीटिंग आली की लगेच खाली सुनामी, चक्री वादळ, भूकंप..
देवाने वर रेफ्रेश केल की खाली लगेच दिवस चेंज.

असं म्हणतात की ब्रम्हदेव निर्मिती करतात, विष्णू संगोपन आणि शंकर संपवतात.
दर महिन्याला विष्णुदेव शंकर देवाकडे डेटा पाठवणार.

"या महिन्यात वेळ संपलेल्यांची यादी"
शंकर देव लगेच फाईल  यमाकडे पाठवणार. तितक्यात विष्णुदेवाच्या लक्षात येणार अरे एक नाव चुकून लिहील गेलं. लगेच मेल फोन जाणार.
आणि खाली पृथ्वीवर एखादी व्यक्ती एखाद्या १०० च्या माळ्यावरून पडताना मधेच कुठेतरी अलगद अडकणार.
वर देव बिचारा आपला घाम पुसत असणार आणि आपण खाली चमत्कार म्हणून टाळ्या वाजवणार. :)

रोज रोज असा काहीतरी गोंधळ, कुठे चमत्कार, कुठे नमस्कार, या सगळ्यात कॉम्पुटर hang.
मग alt + ctrl + delete : आणि खाली कलयुग संपून दुसर युग सुरु होणार.

पण कामाच्या वेळेस देव त्याच खर काम करणार. खर्या भक्तांच्या अडचणी सोडवणार. त्यांची मदत करणार. न सांगता, न मागता.
तो अडकलेला असतो त्याच्या जवळच्या लोकांच्या  प्रश्नात. तो विचारात असतो सगळ्यांच भलं करण्यात.

आजकाल देवाच्या ऑफिस (मंदिर) पुढे भेटायला येणार्यांची गर्दी वाढतच चालली आहे. सुट्टी असेल तर मुंगीसुद्धा घाबरून आत नाही जाणार इतकी गर्दी.
लोकांमधली भक्ती वाढली की पाप धुण्याची गरज??

बहुतेक पाप धुण्याची गरज.

'प्रत्येक माणसात देव आहे' ही संकल्पनाच नाहीशी झालीये. माणुसकी दिसेनाशी झालीये.
देवाला लाख रुपये देणगी म्हणून देणारे आपण रस्त्यावरच्या गरिबाला २ रुपये पण देत नाही.
मॉल मध्ये जाऊन ७०० रुपयांची गोष्ट १००० ला घेणारे आपण ५ रुपयाच्या भाजीत 1 रुपयासाठी घासाघीस करणार.
देवाची मूर्ती १ मिनिट जास्त दिसावी म्हणून दुसर्या माणसाला धक्काबुक्की करून जाणार.

मग कसे काय आपण पुण्य कमावणार? म्हणूनच देवस्थळी गर्दी. पुण्य तर मिळत नाहीये, कमीत कमी पापाचा भरलेला घडा तरी वेळोवेळी रिकामा करून यावं, म्हणजे नव्याने पाप करायला परत मुभा. मला तर वाटत देवाने पाप पुण्याचे घडेही बदलले असतील.
पुण्यासाठी छोटा तांब्या आणि पापासाठी मोठा रांजण...

देवही बसल्या बसल्या विचार करत असेल, इतके लोक, त्यांचा इतका पाप पुण्याचा हिशोब, मागचा जन्म, पुढचा जन्म आणि अजून काय काय...
माझा तर ठाम विश्वास आहे,देव ज्याचा त्याचा हिशोब ज्या त्या जन्मताच पूर्ण करत असेल. सगळ करून बाकी नेहमी शून्य.

मग आपण त्यावर तोडगा म्हणून या देवाचा अभिषेक कर, त्या देवाचा हवन कर, इकडे देणगी दे, त्या ग्रहाची शांती कर आणि अजून बरंच काही.

मग या सगळ्याला वैतागून देव शेवटी एकच करणार.
alt + ctrl + delete
alt आणि ctrl तर बहुतेक देवाने दाबल आहे. फक्त delete बाकी आहे. बघूया आपण देवाला कधी भाग पाडतो ते.


...आयुष्य खूप सुंदर आहे, ते अजून सुंदर बनवणार...

Thursday, January 19, 2012

नाती (पुन्हा एकदा)

प्रत्येकाच्या आयुष्यात कोणीतरी एक व्यक्ती अशी असते की त्या व्यक्तीसाठी आपण जगात काहीही करू शकतो. मानाने आपल्या एकदम जवळचं असं कोणीतरी.
आणि बऱ्याचदा ती व्यक्ती मित्र / मैत्रीण असते. नात्यापेक्षा मैत्री जवळची होते.

मैत्री हेही एक नातच आहे म्हणा. आई, वडील, भाऊ, बहिण यांच्या सोबतीने उभा राहू शकेल इतक्या ताकतीच आहे.

नात म्हणजे खर तर दोन माणसांमधील समीकरण. प्रत्येकाच्या जन्माबरोबर बरीच समीकरणे तयार व्हायला सुरु होतात. जस जसे आपण मोठे होत जातो समीकरणे किचकट व्हायला लागतात. प्रत्येकाच्या स्वभावानुसार आपण त्याच्या समीकरणात अधिक वजा करत जातो. आणि मग त्या समीकरणांचा वापर करून गणित सोडवतो.

आई-मुलगा, वडील-मुलगी, भाऊ-बहिण, मामा-भाचा, वाहिनी-दीर, मित्र.
काही नाती जन्मतःच तयार होतात तर बाकीची मैत्रीतून फुलत राहतात. कधी कट्ट्यावर, गल्लीत खेळताना, वर्गात शिकताना, ऑफिस मध्ये काम करताना किंवा असाच कुठेतरी सहजच फिरायला गेलेलो असताना.

माझ्यासाठी तरी नात हि संकल्पना एकदम सरळ सोप्पी आहे.
दोन जणांमधील थेट कनेक्शन. एखादा दोरा जणू. आणि जिथे दोरा आला तिथे गुंता होणारच. आपल्याला चैनच पडत नाही त्याशिवाय. :)
मुंबई पुणे मुंबई चित्रपटातील वाक्य आहे, "नात्यांची खरी मजा ती उलगडण्यात असते, पण आपण ती उलगडूच देत नाही."
खरच उगाचच धसमुसळे पण करून आपण गुंता करून ठेवतो. आणि मग गुंता वाढतच जातो. परिणामी शेवटी कुठेतरी एक दोरा तोडावा लागतो. कधी कधी तर पूर्ण दोरच फेकून द्यावा लागतो.

कोणत्याही नात्यामध्ये फार ताकद असते असं ऐकल होत. मग का भाऊ भावाला विचारात नाही, आई वडिलांना घरात जागा नाही, नवरा बायकोचं पटत नाही.
प्रत्येक गोष्टीत कामाला येणारा दोरा, गुंता झाला की मग आपलाच हात कापतो. तसच काहीसं होत.

नात्यात दुरावा येतो, म्हणून की काय आजच्या जगात विभक्त कुटुंब पद्धत रूढ होत चालली आहे. लांब राहिल्याने प्रेम टिकून राहत म्हणे.

नात्यात दुरावा एकत्र राहिल्याने येत नाही, त्याचा खर कारण आहे अविश्वास.
बर्याचदा असं होताना दिसत, कालपर्यंत जीवाला जीव लावणारे भाऊ अचानक एकमेकांच्या जीवावर उठतात. काळापर्यंत जीवश्च कंठश्च असणारे मित्र आयुष्यभर एकमेकांचा तोंड पाहत नाहीत.
आणि ते पण अचानक??

पडद्यामागच्या घडामोडी कायम पडद्यामागेच राहतात.
प्रत्येकाला वाटत असत, आपण वागतोय ते बरोबर आहे आणि सगळ्यांनी तसच वागाव. 'माझ्या मनात काही नसत रे, मी उगाच चेष्टा करत असतो.'
पण समोरच्याला हेच वागण चुकीच वाटत असत.
कोणाच मन मोडू नये म्हणून आपण सुरवातीला काही बोलत नाही. आणि नंतर हि सवय होऊन जाते. आणि नकळतच आपण कोणाचातरी मन दुखावून बसतो.
'एका छोट्याश्या काडीने उंटाची पाठ मोडावी' तसं नात मोडत.

एक मनमोकळा संवाद हि परिस्थिती रोखू शकतो, पण हा संवाद सुरु कोणी करायचा? स्वाभिमान नात्यासाठी बाजूला कोणी ठेवायचा? आणि जर ठेवलाच तर समोरचा त्याचा मान ठेवेल का?? अश्या एक ना अनेक प्रश्नांमध्ये आपण वेळ गमावून बसतो.
छोटीशी ठिणगी जर वेळीच नाही विझवली तर पूर्ण जंगल जळून जात, तसं आपण मन जाळून बसतो. मनावर झालेले घाव कोणीच विसरत नाही.
आपण नेहमी सुसंवाद ठेवला पाहिजे असं म्हणतात ते यासाठीच कदाचित.

"संसार हा रबर बेन्ड सारखा असतो, ताणला ना दोन्ही बाजूने तर तुटणारच. एकाने तरी सैल सोडायला हवा." (अगबाई अरेच्चा सिनेमातील)
कोणीतरी स्वाभिमान बाजूला ठेवून सुरुवात करायलाच हवी. अर्थात समोरच्यानेही तितकीच साथ दिली तर प्रश्न लवकर सुटतात.

संसाराप्रमाणेच प्रत्येक नात्यातही असाच काहीस वागाव लागत.

रेशमी धागाच तो. तलम, मऊ, सुंदर, मनाला भिडणारा आणि तितकाच नाजूक. जपायलाच हवा.
एक छानसं गाढ विश्वासच कवच घालून. कर्णाच्या कवच कुंडलासारख. मग कितीही मोठं वादळ येउदे, आतली सुंदरता तशीच राहते.

आपल्याकडच्या प्रत्येक रेशमी धाग्याला असं एक कवच असलं की मग आयुष्य सुंदर होत जात. जगण्यात मजा येते. बघा प्रयत्न करून.


...आयुष्य खूप सुंदर आहे, ते अजून सुंदर बनवणार...