Wednesday, June 2, 2010

तुम्हीच ठरवा....

परवा एका office मध्ये गेलो होतो. तिथे १ जुना मित्र भेटला. मला बघून हसला.
हाय हेल्लो करून परत जागेवर जाऊन बसला. खाली मान घालून परत कॉम्पुटर मध्ये बुडाला.
पण त्याच ते हसण, हाय हेल्लो पहिलेसारख नव्हत. त्याच्या हसण्यातले काहीतरी हरवलेले होते.
क्षणभर वाटल तेच काहीतरी तो कॉम्पुटर मध्ये शोधात असेल.

मी माझ काम करून घरी आलो. त्याचा चेहरा सारखा समोर येत होता.

जुने दिवस आठवून सहज कॉलेज मधले फोटो बघत बसलो.
जवळ जवळ सगळ्याच फोटोत तो होता. trip असो किंवा कॉलेज मधे gathering, एखादं competition असो किंवा वर्गात कोणाची खोडी काढायची असो. सगळीकडेच महाशय पुढे असणार.
आमच्या वर्गातल्या उत्साहाच्या नदीच उगमस्थान आणि समुद्र सगळ तोच.

त्याचं ते जुन version माझ्या मेमरी च्या archive मधून समोर आलं.
कितीतरी फरक पडला होता त्यात. का बदल झाला इतका??
विचार करत करत फोटो बघत होतो आणि convocation चे फोटो समोर आले.

placement चे दिवस आठवले. interview session आठवले.
आणि बदललेल्या आयुष्याची सुरुवात आठवली.

पहिल्यांदाच  सगळ्यांनी एकत्र येण्याच्या ऐवजी स्वतःचं selection व्हावं म्हणून प्रार्थना केल्याचं आठवल.
आयुष्याच्या race ची सुरुवात कदाचित तिथेच झाली. मित्रा ऐवजी स्वतःसाठी  प्रार्थना करण्याची सवय आयुष्याने तिथे लावली. मित्रांमध्ये मैत्री ऐवजी स्पर्धा सुरु झाली.

नव्या आयुष्यात सगळ काही सुरळीत होत. उलट जास्त मजा होती. नवीन ऑफिस, नवीन मित्र आणि सगळ काही नवीन. सुरुवातीचे काही महिने सगळं छान छान होत. ट्रेनिंग चालू होत, कामात काहीतरी नवीन शिकायला मिळत होत, रोज सगळ्यांच्या ऑफिस मधल्या गमती कळत होत्या, सगळ कस अगदी एखाद्या छान गोष्टी सारख होत.

पण हळू हळू काम वाढत गेलं, भेटण कमी झालं. email आणि messenger ने आमची भेट करून देण्याची जबाबदारी घेतली. आधी वाटायचं याला काय अर्थ आहे, पण नंतर ते बर वाटायला लागल.
मित्राच्या लाथ मारून उठवण्यापेक्षा messenger चा गुड मोर्निंग बरा वाटायला लागला. मित्राला मिठी मारण्यापेक्षा messenger चा smiley creative वाटायला लागला.

कामच प्रेशर वाढायला लागल तसं messenger चे hi-hello पण कमी झाले. आणि मग भेटल्यानंतर चे प्लान काय या पेक्षा भेटण्याचं planning कराव लागल. मला सुट्टी नाही, माझा boss येणार आहे, फार काम आहे, अश्या अनेक  कारणांनी भेटण पण जवळ जवळ बंदच झालं.

खरच इतक अशक्य होत का मित्रांना भेटण???

काही जण म्हणतील, "बाबा तुला माहित नाही माझा boss कसा आहे?" काही म्हणतील, "अरे माझ काम तू करून बघ मग कळेल तुला." आणि अजून बरच काही.

थोडा विचार केला, आणि वाटल कि कधी कधी मी पण अशीच काहीतरी कारण देतोच कि, प्रत्येकाचे कारण वेगळे असतील पण अशी कारण कोण मुद्दाम का देईल?? परिस्थितीच कारणीभूत असते.

क्षणभर वाटले कि मी स्वतःला समजावत होतो. पण नंतर कळल कि केलेल्या चुकांचं मी समर्थन करत होतो.
कॉलेज मध्ये असताना रात्र रात्र जागून काम केलं नव्हत??? थकून रूम वर आलो तरी मित्रासोबत बाहेर गेलो नव्हतो?? सेकण्ड हाल्फ ऑफ मिळाला तर लगेच फिरायला गेलो नव्हतो??? आणि अशी यादी वाढतच गेली.
पण तितक्यात माझ्यातल्या professional ने डोकं वर काढल. अरे बाबा तेव्हा tension नव्हत, आयुष्याची चिंता नव्हती, आता जॉब सांभाळावा लागतो. कशीतरी स्वतःची समजूत काढून मी परत फोटो बघायला लागलो.

जुन्या आठवणी जरा ताज्या कराव्या म्हणून जुने mail, chat वाचत बसलो.
एक fwd mail होता. Great Personality. आपले माजी राष्ट्रपती डॉ. A. P. J. अब्दुल कलाम यांच्या ऑफिसमधला किस्सा होता तो. त्यांचा junior कामात busy असतो म्हणून ते स्वतः त्याच्या junior च्या मुलांना फिरायला घेऊन जातात. क्षणात "अग्निपंख" परत वाचाल्यासारख वाटल.

त्यांना tensions कमी होती? कामाच pressure कमी होत??? किती तरी लोकांना उत्तर द्यायचं होत..
लोकांच्या किती अपेक्षा होत्या त्यांच्याकडून...
ते राष्ट्रपती असताना एकदा पुण्यात आले होते. पूर्ण दिवस काही न काही कार्यक्रम होते. त्यांच्या schedule मध्ये १ मिनिट पण जागा नव्हती. कर्वे रोड ची ट्राफिक बंद केली होती कारण त्यांची गाडी तिथून जाणार होती. मी तिथेच होतो. एकामागे एक भरधाव गाड्या जात होत्या. आणि अचानक statue म्हणाव तश्या सगळ्या गाड्या थांबल्या.
डॉ. कलाम गाडीतून खाली उतरले आणि तिथे उभ्या असलेल्या काही लहान मुलांशी हसून थोडा वेळ बोलले.

हि गोष्ट जवळपास सगळ्यांनाच माहित आहे कारण दुसर्या दिवशी पेपर ला मुख्य बातमी होती.

जर त्यांना त्यांच्या कामातून काही मिनिट काढता येतात तर मग माझ्या सारख्याला दिवसातला अर्धा तास का मिळू नये? हेच त्यांच्यासोबत काम करणाऱ्या अजून बर्याच लोकांच्या बाबतीत बघता येईल. मग ते राष्ट्रपती भवन असो किंवा इस्रो असो किंवा साराभाई रिसर्च सेंटर असो. कामच tension घेण्यापेक्षा त्याला एन्जॉय का नाही करायचं?   त्यांना शक्य आहे तर मग मला का नाही?

त्यांना शक्य आहे, ते राष्ट्रपती होते, त्यांना कोणाला उत्तर द्यायचं नव्हत. थोडा उशीर झाला कुठे, तरी त्यांना बोलणार कोणी नव्हत.
का त्यांना देशाच्या १०० कोटी लोकांना उत्तर द्यायचं नव्हत? देशाचे पहिले नागरिक म्हणून त्यांचा हे कर्तव्य ते करत नव्हते?

आणि मग याच वाद-प्रतिवादात मी बराच वेळ घालवला. आणि शेवटी उत्तर ठरलेलंच होत.
मी माझ्या चुकांचं समर्थन करण चूकच आहे. वेळ काढला तर सगळ्यांकडेच असतो. तो काढायची फक्त इच्छा हवी असते.

सगळेच जण मोठ्या कंपनी मध्ये काम करतात. सगळ्यांचाच ऑफिस ७ पर्यंत सुटत. मग सगळे मित्र मिळून अर्धा तास भेटू नाही शकत??
परत थोडा वेळ सगळ्या चिंता बाजूला ठेवून थोडी मजा करावी. एखादी मुलगी दिसली तर मित्राला म्हणाव "खाली उतर मी तिला घेऊन जातो.", त्यानेही म्हणाव "तुला जर कानाखाली बसली तर मी तुला ओळखत नाही"
पुन्हा एकमेकांची थोडीशी खेचावी.

रोज नाही जमणार कदाचित, घरचे वाट बघत असतात मुलांना फिरायला घेऊन जायचं असत, पण आठवड्यातून २ दिवस का जमू नये? महिन्यातून एखादा रविवार ट्रीप का जमू नये?

कॉलेजला असताना couples ना बघून मनात विचार यायचा आपण अस मुलीला मागे बसवून केव्हा फिरणार? आता हक्काची बायको आहे तर तिला फिरवायला वेळ का मिळू नये?

हे सगळ लिहित असतानाच माझ्या एक मित्राने त्याला सांगितलेला किस्सा:
मित्राच्या ऑफिस मधला एक मुलगा मित्राला संगत होता ...
त्याचे जिजाजी २ वर्षे OUT OF इंडिया होते. तर त्याच्या भाच्याच्या admission कार्ड , result कार्ड ह्यावर तोच सही करायचा. आता जिजाजी परत आले आहेत पण मुलांच्या सवयी जुन्याच. ते सगळे मामालाच सांगतात, बापाशी फार कमी बोलतात. मामला सांगावे लागते. तुम्ही पप्पाकडे जा.
तो बाप हे सगळ कोणासाठी करत होता? मुलांसाठीच ना? मग अशी परिस्थिती का आली? का मुलांना बाबापेक्षा मामा जवळचा का झाला?? मामाच्या गावाला जाऊया हे ऐकण्याऐवजी  बाबांच्या गावाला जाऊया हे का ऐकाव लागल???

हे असे प्रश्न बरेच आहेत आणि त्यांच्यापासून पळायचं असेल तर कारण हि बरीच आहेत.

पण मी ठरवलंय आता कारण बंद करायची आणि वेळ काढायचा. ते दिवस परत आणायचेच. त्रास होईल कदाचित, काम आणि घर सांभाळून बाहेर पडायला. पण यातून मिळणारा आनंद त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त असेल. कदाचित माझ आयुष्य अजून बदलेल. पण एक नक्की तो बदल चांगलाच असेल.

priority तुम्ही ठरवा ...
वैयक्तिक आयुष्य, तुमची मित्र, कुटुंब, बायको पोरे कि ऑफिस.....
निवड तुमची आहे.
आयुष्य हसत जगायचं कि आपल्या "Sad Demise" चा mail ऑफिस मध्ये फिरवायचा.....

...आयुष्य खूप सुंदर आहे, ते अजून सुंदर बनवणार...

No comments:

Post a Comment